८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

२५ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रंथदिंडीचा प्रारंभ
संध्याकाळी ७. ३० वाजता गंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते

२६ मार्च (पहिला दिवस) : सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण
दुपारचे सत्र : '२१ वे शतक आणि संतसाहित्य'वर परिसंवाद. सहभाग : उल्हास पवार, फेलिक्स मिचेडो (वसई), डॉ. किशोर सानप (वर्धा), फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ. सदानंद मोरे
निमंत्रितांचे कविसंमेलन : 'मराठी कविता आणि ग्रामीण वास्तव'वर परिसंवाद. अध्यक्ष : डॉ. सुषमा करोगल कथाकथन. सहभाग : विनोदी लेखक द. मा. मिरासदार, रेखा बैजल, रमा मराठे, बाबा परीट

२७ मार्च (सकाळचे सत्र) : प्रकट मुलाखत : लेखक श्याम मनोहर आणि मेघना पेठे.
दुपारचे सत्र : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव'वर परिसंवाद. सहभाग : डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. जब्बार पटेल, संजय राऊत, अवधूत गुप्ते.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर:मुलांशी संवाद :
'मनोरंजनाच्या नादात आजच्या बालसाहित्यातील मूल्यभान हरपत चालले आहे'वर परिसंवाद. अध्यक्ष : डॉ. न. म. जोशी. 'साहित्य संस्था आणि कालानुरूप अपेक्षित बदल'वर चर्चा.
संध्याकाळचे सत्र : 'माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा'वर परिसंवाद. रात्री 'आनंदयात्रा' हा सांस्कृतिक कार्यक्रम

२८ मार्च (समारोप) : सकाळच्या सत्रात रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन.
'महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर करण्याची सक्ती करणे काळाची गरज आहे' यावर परिसंवाद. सहभाग : न्यायमूर्ती चंदशेखर धर्माधिकारी, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मनोहर जोशी, विनोद तावडे.
'कथा हा खरोखरच गौण वाङ्मय प्रकार आहे का? ' आणि 'साता समुदापलीकडील मराठी लेखन' यावर परिसंवाद.
दुपारच्या सत्रात 'मराठी साहित्यातील नवे भान, नव्या वाटा'वर डॉ. नरेंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद.

Hits: 345
X

Right Click

No right click