Designed & developed byDnyandeep Infotech

बंधुमाधव

Parent Category: व्यक्तिपरिचय

१९४० नंतर जे दलित लेखक डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा विचार घेऊन आघाडीवर आले त्यात बंधु माधवांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कथा, कादंबर्‍या, नाटके त्यांनी लिहिली. `आम्ही ही माणसं आहोत’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाची एका वर्षात तिसरी आवृत्ती काढावी लागली. `विखारी भाकरी' ही त्यांची पहिली कथा. त्यात अस्पृश्यतेचे चटके, जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. `गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करुन देण्यासाठीच आपण लिहित आहोत' अशी प्रतिज्ञा घेऊनच ते वाटचाल करु लागले. `महारवतनी कथा' ही त्यांनी मराठी कथेला दिलेली देणगीच मानली जाते.

X

Right Click

No right click