Designed & developed byDnyandeep Infotech

पावस

Parent Category: महाराष्ट्र दर्शन
     
     सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यन्त सुबोधणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ' हा ट्र्स्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे.
     पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात.

मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत.
X

Right Click

No right click